इस्लामाबाद | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर,
पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट पसरली आहे. भारताने प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केलेली नसली तरी आर्थिक,
Related News
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”
पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची टरकली; पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला
ऑपरेशन सिंदूरनंतर वीरेंद्र सेहवाग, रैना आणि राहुल गांधी यांची भारतीय लष्कराला सलामी
राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान भयभीत अवस्थेत पोहोचला आहे.
भारताकडून कठोर कारवाया सुरू झाल्याने पाकिस्तानला “कधीही युद्ध होऊ शकते” अशी धास्ती वाटत असून,
आता तो आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरू लागला आहे.
सौदी अरब, यूएई, कुवैतकडे मदतीची याचना
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरब,
संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवैतच्या राजदूतांची भेट घेतली आहे.
यावेळी त्यांनी भारतावर “तणाव कमी करण्यासाठी दबाव टाकण्याची” विनंती केली आहे.
पाकिस्तानकडून मित्र देशांना सांगितले जात आहे की, भारत आक्रमक पावले उचलत आहे
आणि परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी भारतात हस्तक्षेप करावा,
असा आग्रह पाकिस्तानकडून केला जात आहे.
भारताकडून अद्याप शांत परंतु ठाम भूमिका
भारताने अद्याप प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केली नसली तरी, पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राला फटका देणाऱ्या आणि व्यापारी
संबंध थांबवणाऱ्या निर्णयांमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती प्रतिमा आणि कणखर भूमिका यामुळे पाकिस्तान आणखीनच दबावात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-minister-ladki-bahin-yojana-ladkya-bahini/