मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
Related News
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण अचानक रद्द करण्यात आलं.
या गोष्टीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कार्यक्रमाच्या मूळ वेळापत्रकात शिंदे आणि अजित पवार यांना ५-५ मिनिटांचं भाषण देण्यात येणार होतं.
मात्र कार्यक्रमाच्या आदल्या रात्री वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि नवीन यादीत केवळ
राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांचा समावेश ठेवण्यात आला.
यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित राहूनही बोलू शकले नाहीत.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट निघून गेले, तर एकनाथ शिंदे
यांनी ठाण्याला परत जाऊन पत्रकार परिषद घेत नाराजी फेटाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी भाषणाच्या
कार्यक्रमात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/machis-nahi-dili-mahanun-cruel-massacre-delhi/

