अकोट, प्रतिनिधी (राजकुमार वानखडे) – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन गेल्या चार दिवसांपासून खंडित असून,
यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले असून,
नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
५० हजारांची थकबाकी; कनेक्शन कट
ग्रामपंचायतच्या वीज बिलाची ५० ते ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
मात्र, ग्रामपंचायतीकडे महावितरणच्या करपोटी ८५ हजार रुपये बाकी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव गणेश जाधव यांनी सांगितले की, “विजेच्या थकबाकीबाबत
महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ही अन्यायकारक बाब आहे.”
महावितरणचा दावा – “वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने कारवाई”
महावितरणचे उप अभियंता उद्देश शेंद्रे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकले आहे.
वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या होत्या,
मात्र त्यांनी बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला.”
ग्रामस्थांमध्ये संताप; त्वरित वीज जोडणीची मागणी
ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून,
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.