अकोट, प्रतिनिधी (राजकुमार वानखडे) – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन गेल्या चार दिवसांपासून खंडित असून,
यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले असून,
नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
५० हजारांची थकबाकी; कनेक्शन कट
ग्रामपंचायतच्या वीज बिलाची ५० ते ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
मात्र, ग्रामपंचायतीकडे महावितरणच्या करपोटी ८५ हजार रुपये बाकी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव गणेश जाधव यांनी सांगितले की, “विजेच्या थकबाकीबाबत
महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ही अन्यायकारक बाब आहे.”
महावितरणचा दावा – “वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने कारवाई”
महावितरणचे उप अभियंता उद्देश शेंद्रे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकले आहे.
वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या होत्या,
मात्र त्यांनी बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला.”
ग्रामस्थांमध्ये संताप; त्वरित वीज जोडणीची मागणी
ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून,
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.