अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार!
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी की ऊसाचा रस – कोणते पेय अधिक फायदेशीर?
गोंदा तालुक्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
महागाईचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर!
IPL 2026 शेड्यूलवर मोठा अपडेट: BCCI घेत आहे टप्प्याटप्प्याने निर्णय
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 वरून 29 रुपयांवर; गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का
केरळ राज्याचे नाव बदलणे योग्य आहे का? केंद्राने दिली मंजुरी!
जळगाव सराफा बाजारात सोन्याचा धक्का! 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ? ही 10 चिन्हे लक्षात घ्या!
हिना खानने इफ्तारसाठी बनवली पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.
