अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
नायब तहसीलदारांनी शेतातच भरवले न्यायालय; शेतकऱ्याला दिलासा
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.