अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या
पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला
जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष
गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे.
➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही.
➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला,
तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन
“आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही.”
नागरिकांचे म्हणणे
गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार)
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही.
महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.”
➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.