भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी…घाणीवाला… मुर्तिजापूर..दि.२०
( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी व
शासकीय बॅंका,काॅंलेज, महाविद्यालय असुन शहराला जंक्शन रेल्वे स्टेशनचा दर्जा प्राप्त आहे.अशा शहरातील
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
एक महत्त्वाचा चौक म्हणजे भगतसिंग चौक असुन या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते अशा या
महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक तथा जिल्हा
नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.मुर्तिजापुर शहर हे दोन विभागात वसलेले आहे.
स्टेशन विभाग व जुनी वस्ती शहरातील नागरिकांना येण्या व जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग आहे.
जुनी वस्तीतील भगतसिंग चौक हा शहरातील एकमेव मुख्य चौक आहे.या चौकात नेहमी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते.
आणी वाहतूकीची कोंडी निर्माण होते.सदर चौकातुन दिल्ली.. हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
दररोज मोठ्या संख्येने जडवाहनांची रेलचेल सुरू राहते.त्यातच याच चौकात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.
तसेच याच मेन रोडवरून विविध शाळा, खाजगी शाळेतील लहान लहान मुलं व मुली पायदळ ,सायकलने शाळेत जातात.
अशातच जड वाहनांची रेलचेल सुरू राहते.अशातच या भगतसिंग चौकात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
यापुर्वी याच चौकात एका डाॅकटरचा अपघाती मृत्यू झाला आहे.किरकोळ अपघात तर दररोजच होतात.
अशा वर्दळीचा या चौकात तात्काळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी एका
निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या कडे माजी नगरसेवक त
था जिल्हा नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.