विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला.
दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक झालेले दिसले.
याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या कामकाजात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले दिसले.
Related News
UP सरकारचा मोठा निर्णय! ग्रेटर नोएडा आणि वाराणसीत ESI मेडिकल कॉलेज उभारणार,
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! AC लोकलचे भाडे न वाढवता नव्या ट्रेन येणार;
भारतीय सेना मे आयेगा नया एअर डिफेन्स सिस्टम
11 वर्षातील विकासाचा पंतप्रधान घेणार आढावा:; नमो ऍपवर सर्वे सुरु
रामापुरचे तलाठी निवासी कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात!
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर
सूरजागड लोह खाण प्रकल्पाला हिरवा कंदील, पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध
वटपौर्णिमा -अक्षय वृक्ष प्राणवायू देणारा वड
वटपौर्णिमा हे एक व्रत व परंपरा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अंबादास दानवेंची खडाजंगी झाल्याने 15 निटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आज जोरदार बाचाबाची झाली.
अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत?
मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम
असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण)
चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का?
असा प्रश्न दानवे यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन मध्येच बोलले, त्यानंतर दानवेंचा पारा चढला. मी तुमच्याशी बोलत नाही, मला बोलूद्या.
सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नाहीतर मी जातो, त्यानाच बोलूद्या म्हणत दानवे संतापले.
ही हमरी-तुमरी एवढी वाढली की अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.