RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,” असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रविण मुधोळकर, नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या एका वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. “समाजासाठी कोणताही प्रकारचा हिंसाचार चांगला नाही.Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे.
आरएसएसच्या या स्पष्टीकरणाने सरकारला तसेच विश्व हिंदू परिषदेचे कान टोचल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे 380 वर्षांपासून औरंगजेबाची कबर आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या नियमांतून ती बाहेर काढून उखडून टाकावी.
अन्यथा,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतः ती उखडून अरबी समुद्रात फेकून देतील..
असा इशारा विश्व हिंदू परिषदने सोमवारी दिला होता. त्यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला.
विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
त्यावर काही मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी महाल परिसरात जाळपोळ झाली आणि संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण लागले.
देशभरात यावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,” असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर विश्व हिंदू परिषदेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
हिंदू समाज कधीच हिंसेचे समर्थन करत नाही आणि हिंसा करतही नाही. हिंदूंना हिंसक ठरवण्याचा कोणाचाही प्रयत्न चुकीचा आहे.
नागपुरातील दंगल ठरवून आणि नियोजनपूर्वक घडवून आणली गेली आहे. त्यामुळे या दंगलीचे कोणीही समर्थन करू शकत नाही,
असे विश्व हिंदू परिषदचे महाराष्ट्र क्षेत्र संघटन मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन झाले. दरम्यान, नागपुरात दंगल घडल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,’
असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केल्यामुळे या वादाला आणखी पेट मिळाला आहे.