Eknath Shinde : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे.
ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे.
Eknath Shinde : सध्या राज्यात खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Related News
रेपो रेट कमी झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्यांना काय फायदा? EMI की मुदत – नेमकं कशावर परिणाम होतो?
RBI चं पतधोरण जाहीर होतं तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष एका शब्दावर खिळतं —
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
युद्ध थांबताच LPG वर केंद्राचा मोठा निर्णय! नवीन पुरवठा फॉर्म्युला जाहीर – कोणाला सर्वाधिक फायदा?
अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल 40 दिवस चाललेल्या युद्धामुळे जगभरातील इंधन आणि गॅस ...
Continue reading
युद्ध थांबलं तरी Iran मध्ये भीषण स्फोट! लावन बेटावर रिफायनरी हादरली; नेमकं काय घडलं?
Iran आणि America ने नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम ज...
Continue reading
US–Iran Ceasefire : युद्धविरामानंतर काही तासांतच नेतन्याहू यांची धडाकेबाज घोषणा; जगभरात पुन्हा खळबळ, पाकिस्तानचाही दावा फेटाळला
मध्य पूर्वेत तब्बल 38 दिवस धुमसलेल्या युद्धानंतर जग...
Continue reading
ATM विसरा! Paytm चे मोठे अपडेट; आता मोबाईलला हात लावताच पेमेंट, कार्डशिवाय ATM मधून काढा पैसा!
डिजिटल पेमेंट्सच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा अपडेट P...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला एवढा मोठा मध्यस्थीचा मान का दिला? यामागे ही दोन मोठी कारणं!
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभरापासून स...
Continue reading
अमेरिका-इराण शस्त्रसंधी: भारतासाठी मोठी खुशखबर, गॅस-पेट्रोल सगळं स्वस्त होणार
अमेरिका आणि इराण या दोन महाशक्तींनी अचूक वेळेत दोन आठवड्यांसाठी...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
ST महामंडळाचा प्रवाशांना मोठा धक्का: बस भाड्यात 10% वाढ, 15 एप्रिलपासून नवीन दर लागू
राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि सोयीचा प्रवास मार्ग असलेल्या
Continue reading
फक्त १५ मिनिटांत बनवा प्रोटीन-पॅक्ड Bombay Sandwich – स्वादिष्ट आणि पोषक
भारतीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परिचित असलेला Bombay Sandwich ...
Continue reading
Iran-US युद्धविराम: भारतीय दूतावासाने जारी केली नवीन सुरक्षा एडवायजरी, नागरिकांनी लगेच घ्यावे ही खबरदारी
Iran-US यांच्यात सुरू असलेला तणावाच्या पार्श...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून केली जात आहे.
राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.
त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे.
खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणार?
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दिल्लीवारीत ते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केंद्रीय नेतृत्त्वाकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना शिंदे यांच्या या दिल्लीवारीला चांगलेच महत्त्व आले आहे.
खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर ते दिल्लीतील नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता आहे.
याच भेटीत ते महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्याचा मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्तगिरी येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला होतील रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे?
विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी, ही मागणी घेऊन आंदोलन केले जात आहे.
याच मुद्द्यावर शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 मार्च रोजी पहिल्यांदाच भूमिका मांडली होती.
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, अशी शिवभक्तांची मागणी आहे. माझीही हीच भावना आहे,
असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. औरंगजेब महाराष्ट्राचा दुष्मन होता, राष्ट्रद्रोही होता, त्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे.
जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, त्यांना निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती.