मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर
यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे.
Related News
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं.
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते,
राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे.
मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते,
आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो असतो, असंही आव्हाडांनी म्हंटलं आहे.
भारतात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी राज ठाकरे यांचं अभिनंदन
करेल की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिम्मत लागते.
आम्ही बोलायला घाबरतो की आपल्या मागे लागतील हे, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आहेत,
असं म्हणत त्याच्या डेरिंगला सलाम आहे, असं म्हणत आव्हाडांनी ठाकरेंना सलाम ठोकला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/aajchaya-earth-sankalpat-shetkari-debt-forwards-announcement-rohit-pawar/