दिवसेंदिवस चांदीच्या मागणीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला
मिळत आहे. त्यामुळं यावर्षी चांदीची आयात दुप्पट होण्याची शक्यता
Related News
मोफत महाआरोग्य शिबिर..
RCB च्या विजयाचा आनंद साजरा करताना चाहत्यांचा मृत्यू
बेंगलोर मध्ये आरसीबी (RCB) ची विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू…
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची
रोहित पवारांना अमोल मिटकरी यांचा टोला – “हेलिकॉप्टरमधून उतरा, ग्राउंड लेव्हलवर या!
गोरखपूरमध्ये पतीने पत्नीचा गळा चिरून केला खून…
लखनऊ – कानपूर रॅपिड रेल प्रकल्पाला हिरवा कंदील, एलडीएकडून NOC मंजूर
पिंजर येथे जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क सलाईनवर….
मानसून कधी देणार उत्तराखंडमध्ये दस्तक?
संगीता जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड;
शिवाजी नगर शेत शिवारात जंगली जनावराचा हल्ला
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण…
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये भारतातील चांदीची
आयात 6,500 ते 7000 टनांपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे जागतिक
किमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
एका प्रमुख चांदी आयातदाराने दिलेल्या माहितीनुसार, भारतात
चांदीची आयात यावर्षी जवळपास दुप्पट होणार आहे. हे सौर पॅनेल
आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांकडून वाढत्या मागणीमुळे होत आहे.
तसेच, सोन्यापेक्षा चांदी चांगला परतावा देईल, असा विश्वास
गुंतवणूकदारांना वाटत आहे. जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या ग्राहकाने
केलेल्या उच्च आयातीमुळं जागतिक चांदीच्या किमतींना आणखी
आधार मिळू शकेल, जे सध्या एका दशकापेक्षा जास्त काळातील
सर्वोच्च पातळीच्या जवळ आहेत. गेल्या वर्षी भारताने 3,625 टन चांदीची
आयात केली होती. मात्र, यावर्षी औद्योगिक मागणी वाढल्याने यावर्षी
चांदीची खरेदी 6,500 ते 7,000 टन दरम्यान होऊ शकते.
2024 च्या पहिल्या सहामाहीत भारताची चांदीची आयात एका वर्षापूर्वी
560 टनांवरून वाढून 4,554 टन झाली आहे. चांदीच्या दागिन्यांना
पारंपरिक मागणी आहे. आता लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करत आहेत.
कारण स्टॅम्प ड्युटी कमी झाल्यामुळे चांदी स्वस्त झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/announcement-of-creation-of-five-new-districts-in-ladakh/