दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर
सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.
Related News
शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;
बुद्धगया आंदोलनासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे गाडी सोडावी – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार
“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा”
पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु
पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन
” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….
अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार
जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं.
त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला.
त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे
ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं.
सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे.
हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही.
तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली.
या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये
अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/