पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे
पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे
रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी
मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी
सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.
एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं.
कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती.
यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल.
कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की,
घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/