मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद
राज्यात सध्या डेंग्यू चा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झाला
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
असून, एकूण 13,594 रुग्ण प्रभावित झाले आहेत. डासांमुळे
पसरणाऱ्या या आजारामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील
डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. विशेष
म्हणजे, मुंबईत या आजाराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या
आहेत. ज्यात डेंग्यूची 3,435 प्रकरणे आढळून आली असून 12
मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी रहिवाशांचे प्रबोधन करण्यासाठी
‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
डासांची उत्पत्ती ठिकाणे वेळेवर नष्ट केल्याने डेंग्यू आणि इतर
संबंधित आजारांवर नियंत्रण मिळू शकते यावर या उपक्रमात भर
देण्यात आला आहे. डेंग्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये अंगदुखी, थंडी
वाजून येणे, ताप, खोकला आणि सर्दी यांचा समावेश होतो.
रहिवाशांना पाणी साचू नये म्हणून टायर, नारळाची टरफले,
प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर यासारख्या वस्तूंची तपासणी
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापी, तज्ञांनी फेंगशुई
आणि मनी प्लांट्स सारख्या शोभेच्या वनस्पतींमध्ये नियमितपणे
पाणी बदलण्याचंही आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त, दिवसा
किंवा रात्री झोपताना मच्छरदाणी वापरण्याचा सल्लाही देण्यात
आला आहे. तसेच जुने टायर आणि पाण्याच्या टाक्या यांसारख्या
वस्तूंचा संग्रह टाळण्याचा सल्लाही तज्ञांकडून दिला जात आहे.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती स्वच्छता असणे अत्यंत
आवश्यक आहे. तसेच परिसरात पाणी साचणार नाही याची
काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. साधारणत: डेंग्यूचे डास साचलेल्या
पाण्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका
कमी करण्यासाठी कोणत्याही साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा
करणे आवश्यक आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/confusion-at-the-inauguration-of-ratnagirit-waqf-board-office/