शरद पवारांचे भाकित
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.
कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया.
Related News
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सो...
Continue reading
मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या स...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोप
मुंबई: नागपूरच्...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मा...
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक
व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन
अमानुष म...
Continue reading
सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.
उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात
एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूया,
असे आवाहन करत, विधानसभेच्या २८८ जागा आहेत.
त्यापैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील, असे मोठे भाकित शरद पवार यांनी केले.
या दाव्यासह आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग
शरद पवार यांनी फुंकल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलताना दिसत असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह
सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत
सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी
महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील,
याबाबत मोठे विधान केले.
निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत.
चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात,
ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला सुरुवात केली आहे.
उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येत आहेत.
गेल्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला.
मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केला.
मतदारांनी मते दिली, विधानसभेत पाठवले,
त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली.
पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत,
असे सूतोवाच करत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्ची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले.
देवळालीतील कार्यकर्ते आले आहेत.
हे घर तुमच्या सर्वांचे आहे.
महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे.
हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला.
लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला.
त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ लोकांना निवडून दिले,
ही सुरुवात आहे. आता, विधानसभेच्या २८८ जागा आहेत,
त्यात २२५ पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/india-awakened-us-not-by-war-but-by-giving-us-buddha/