राज्याचे वातावरण सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन
तापले आहे. केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर शिपाई
अक्षय शिंदे याने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
घरच्या घरी चाट बनवताना टाळा हे ६ सामान्य चुका, जे चवीत बिघडवू शकतात
चाट ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड्सपैकी एक आहे. प्रत्येक राज्यात चाटची विविध...
Continue reading
हादरुन गेलं आहे. राज्यसह देशभरातून यावर रोष व्यक्त
केला जात आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही,
कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा
वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
केल्या जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना
घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले.
तसेच येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक काँग्रेसकडून
देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य
सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
राज्य सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा
गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले आहेत की,
बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे समाजमन हेलावून गेलं आहे.
खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाही.
ही घटना महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण
दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.
प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप
आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे.
परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.
सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळाली.
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची
नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी
आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे.
त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने लोकसभेची
निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?
असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-announces-9-candidates-for-state-assembly/