नवी दिल्ली :
केवळ १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने शनिवारी IPL मध्ये पदार्पण करताच आपल्या खेळीने साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सर्वांना चकित केलं.
Related News
जानोरी मेळ जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था;
अकोलाच्या उगवा गावात भीषण पाणीटंचाई;
अश्विनी बिद्रे हत्याकांड: मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप;
पोप फ्रान्सिस यांचे निधन; 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
पोलीस दलात खळबळ
“स्वच्छ अकोला, सुंदर अकोला” – प्लास्टिक विरुद्ध एकजूट!
कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचा इशारा — २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा
✝️ अकोल्यात ईस्टर संडेचा उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
मात्र ही प्रतिभा एका रात्रीत घडलेली नाही. या यशामागे त्याच्या वडिलांचे, प्रशिक्षकांचे
आणि अनेकांच्या अथक परिश्रमांचे योगदान आहे.
वैभवच्या क्रिकेट स्वप्नांना उंच भरारी द्यावी म्हणून त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी
आपल्या शेतीची जमीन विकून त्याला संधी दिली.
पटण्याचे क्रिकेट प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या विशेष गुणी मुलामध्ये असलेली क्षमता ओळखली.
त्यांनी १० वर्षांच्या वैभवला दररोज किमान ६०० चेंडूंचा सामना करायला लावून त्याला मोठ्या स्पर्धांसाठी तयार केलं.
राजस्थान रॉयल्सच्या राहुल द्रविड आणि जुबिन भरूचा यांनीही त्याला झगमगता तारा बनवण्यासाठी मेहनत घेतली.
त्यांनी आयपीएलपूर्वी त्याला १५० किमी प्रतितास वेगाने साइड-आर्म थ्रोडाउनचा सामना करवून दिला.
हे सगळं वैभवसाठी मोठं आव्हान होतं, पण त्याने ते यशस्वीरित्या पार केलं.
आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १.१० कोटी रुपयांना विकत घेतलं.
त्याचे प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही त्याचा शॉट पाहिला, बॅटची स्विंग आणि टायमिंग पाहिलं.
फक्त ताकदीवर षटकार लागत नसतात, नाहीतर सगळे पैलवान क्रिकेटर झाले असते.
ही त्या मुलाच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाची फळं आहे – रोज ६०० चेंडूंचा सामना, हे सोपं नाही.”
आज वैभव सूर्यवंशी केवळ एक खेळाडू नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे,
ज्याच्या यशामागे त्याचा संघर्ष, त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षकांचे कर्तृत्व आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyaye/