पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे,
खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठी
अभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही,
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
या स्पर्धांवर अनेक देशांची राजकीय आर्थिक गणितंही ठरत असतात,
त्यामुळे यजमान देशांच्या अर्थव्यवस्थेसाठीही ही स्पर्धा अनेक पातळ्यांवर महत्त्वाची ठरते.
फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचं यजमानपद भूषवतोय.
पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये याआधीच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्यात
आणि त्यानंतर बरोब्बर १०० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सला स्पर्धेचं यजमानपद मिळालंय.
या १०० वर्षांत जगानं आधुनिकतेकडं झपाट्यानं वाटचाल केली, तसे या स्पर्धांमध्येही आमूलाग्र बदल झाले.
ऑलिंपिक स्पर्धेत पूर्वी सगळ्या खेळाडूंना एकत्र राहण्याची सोय नव्हती,
तशी सोय असावी, असा विचार करत फ्रेंच प्रशासनाने १९२४च्या
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी सगळ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी राहण्याची
तात्पुरती सोय केली आणि त्या ठिकाणाला ऑलिंपिक व्हिलेज असं नाव देण्यात आलं.
त्यानंतर १९३२ मध्ये लॉस एन्जेलिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
पहिल्यांदा मॉडर्न ऑलिंपिक व्हिलेज तयार करण्यात आलं.
१९२४च्या ऑलिंपिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशनच्या दरम्यान
खेळाडूंनी पहिल्यांदा आपले राष्ट्रध्वज घेऊन मार्चिग केलं
आणि त्याच स्पर्धांमध्ये उद्घाटन समारंभासारखाच समारोप समारंभाची प्रथा सुरू झाली.
२०२४चे हे ऑलिंपिक तर इतिहासाला कलाटणी देणारं ठरणार आहे,
शहरात येणाऱ्या दीड कोटीहून जास्त पर्यटकांना सांभाळत
आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धाही शाश्वत विकासाचं मॉडेल होऊ शकतात
हे या स्पर्धांतून सिद्ध होणार आहे.
खेळाडू तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था या सगळ्याच दृष्टीने या स्पर्धा बदलल्या.
तरीही १९२४ आणि २०२४च्या स्पर्धांमध्ये अनेक बाबतीत साधर्म्यही आहे.
१९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर १९२४ चे ऑलिंपिक हे त्यातून सावरण्याच्या काळात झालं होतं
तसंच आताही २०२० मध्ये आलेल्या कोरोनातून सावरण्याच्या काळात
आणि सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली २०२४च्या स्पर्धा होताहेत.
स्पर्धांचं स्वरूप कितीही बदललं तरीही त्यातून जगभरातील खेळाडूंना मिळणारी ऊर्जा,
प्रोत्साहन आणि जागतिक ओळख हीच अशा प्रकारच्या स्पर्धांची खरी कमाई असते,
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/president-draupadi-murmu-will-come-to-maharashtra/