Milind Narvekar Big Demand : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर सभागृहात म्हणाले,
शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल,
त्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा सुरू झाली. काय घडामोड घडली?
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मोठी मागणी केली.
त्यांनी लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचवेळी ते म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल.
त्यांच्या या मिश्किल शेऱ्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा झडली. काय आहे अपडेट?
याप्रकारे आसाम मध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी
गोळ्या घालायचा हा कायदा करण्यात आला. अगदी तसाच कायदा राज्यात सुद्धा करावा लागेल, राज्यात सुद्धा वाघाची
तस्करी आणि शिकार करणार्यांची टोळी कार्यरत असल्याचा दावा मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.
राज्य सरकारची भूमिका काय?
राज्यात वाघाची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फास
अडकल्याची घटना ताजी असताना पवनार येथे पिकेडी टी- ३३ च्या वाघिणीच्या गळ्यातही असाच फास आढळला.
नार्वेकर यांनी वाघाच्या शिकार आणि तस्करीच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.
त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
काय मांडली लक्षवेधी?
वाघाची शिकार तस्करी करणार्याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा,
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका,
आपल्या दोघांना यामध्ये मिळून काहीतर करावं लागेल, असे नार्वेकर म्हणाले.
येथेच आपण कितीतरी वाघ बसले आहोत असं म्हणतो. आता याच आपल्या वाघांनी एकत्र येऊन या वाघांना वाचण्यासाठी काहीतरी करावं,
असं म्हणत आपला प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी मांडला. वाघ वाचवण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची मागणी नार्वेकर यांनी केली.
गेल्या काही दिवसात वाघाची शिकार करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही भागात वाघाची तस्करी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत.