“युक्रेनवर हल्ला… पण भारताला फटका बसणार ?”

“शांतीचा मार्ग दिल्लीहून जातो…

रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा तीव्र झाले असून या संघर्षाचे परिणाम आता जगभर उमटताना दिसत आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने भारतीय अर्थव्यवस्थेलाही या युद्धाचा फटका बसणार आहे.अमेरिकेचा आरोप आहे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो आणि या पैशातून रशिया युक्रेनविरुद्ध शस्त्रास्त्र खरेदी करत आहे. “रशिया-युक्रेन युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जातो,” असे स्पष्ट करत अमेरिकेने भारतावर दबाव टाकला आहे.

28 सप्टेंबरची रात्र रक्तरंजित
रशियाने युक्रेनवर तब्बल 12 तासांचा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. कीवसह सात शहरांमध्ये मोठे नुकसान झाले. या भीषण हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक लोक जखमी झाले, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

रशियासाठी आणखी एक संकट
युद्धाच्या तणावातच रशियामध्ये दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. दक्षिण रोस्तोव्ह प्रदेशात संघीय स्तरावरील कृषी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या अंदाजानुसार यावर्षी 10 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून धान्य उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.युद्ध, निर्बंध, आणि आता दुष्काळामुळे रशियाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या सर्व घडामोडींमुळे भारत आणि जगभरातील अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसू शकतो.

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/today-kalelya-prayanna-yash-mile/

Related News