यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,
असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.
विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत.
नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात.
मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे.
बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे.
अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि त्यानंतर तो फरार झाला,
ही आश्चर्यकारक बाब आहे, असे देशमुख म्हणाले.
बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे. गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. जर शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच.
राज्यात मुली, तरुणी आणि महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.
राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
*कायदा व सुव्यवस्था धोक्यात*
राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी राज्य शासन आणि
गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.