यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,
असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.
विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.
Related News
-शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर
अमरावती, दि. 10 : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे.
त्यानुषंगाने शासनाकडून निपूण महाराष्ट्र अभ...
Continue reading
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत.
नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात.
मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे.
बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे.
अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि त्यानंतर तो फरार झाला,
ही आश्चर्यकारक बाब आहे, असे देशमुख म्हणाले.
बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे. गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. जर शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच.
राज्यात मुली, तरुणी आणि महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.
राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
*कायदा व सुव्यवस्था धोक्यात*
राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी राज्य शासन आणि
गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.