पातुर | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी जात असताना
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
खदान परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून अमानुष मारहाण केली.
गुन्हेगारी वाढली, पोलिस प्रशासन अपयशी?
अकोला जिल्ह्यात सतत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून,
पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.
विशेषतः पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे,
अशी भावना पत्रकार समुदायातून व्यक्त होत आहे.
पातुर तालुका पत्रकार संघटनेचा निषेध व आंदोलनाचा इशारा
या घटनेच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येत
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“जर हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल झाला नाही,
तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन; कारवाईची मागणी
पातुर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार
डॉ. राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात पत्रकार संघटनेचे प्रमुख सदस्य आणि तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते.
पत्रकार संरक्षणासाठी कठोर धोरण आवश्यक
पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे,
अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.
🔴 “पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो.
त्याच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण होणे होय.
त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पातुर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे.