पातुर | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी जात असताना
Related News
मोफत महाआरोग्य शिबिर..
RCB च्या विजयाचा आनंद साजरा करताना चाहत्यांचा मृत्यू
बेंगलोर मध्ये आरसीबी (RCB) ची विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू…
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची
रोहित पवारांना अमोल मिटकरी यांचा टोला – “हेलिकॉप्टरमधून उतरा, ग्राउंड लेव्हलवर या!
गोरखपूरमध्ये पतीने पत्नीचा गळा चिरून केला खून…
लखनऊ – कानपूर रॅपिड रेल प्रकल्पाला हिरवा कंदील, एलडीएकडून NOC मंजूर
पिंजर येथे जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क सलाईनवर….
मानसून कधी देणार उत्तराखंडमध्ये दस्तक?
संगीता जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड;
शिवाजी नगर शेत शिवारात जंगली जनावराचा हल्ला
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण…
खदान परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून अमानुष मारहाण केली.
गुन्हेगारी वाढली, पोलिस प्रशासन अपयशी?
अकोला जिल्ह्यात सतत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून,
पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.
विशेषतः पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे,
अशी भावना पत्रकार समुदायातून व्यक्त होत आहे.
पातुर तालुका पत्रकार संघटनेचा निषेध व आंदोलनाचा इशारा
या घटनेच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येत
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“जर हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल झाला नाही,
तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन; कारवाईची मागणी
पातुर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार
डॉ. राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात पत्रकार संघटनेचे प्रमुख सदस्य आणि तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते.
पत्रकार संरक्षणासाठी कठोर धोरण आवश्यक
पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे,
अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.
🔴 “पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो.
त्याच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण होणे होय.
त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पातुर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे.