हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक
विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांचे नाव द्यावे,
अशी मागणी युवा नाथ संघटना महाराष्ट्र आणि नाथ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
नाथपंथीय समाजाच्या गुरु आणि आराध्य दैवत परमपूज्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे नाव या महामंडळाला देण्यात यावे,
अशी मागणी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी
महामंडळाच्या स्थापनेसाठी शासनाने “परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ”
हे नाव निश्चित केले आहे. मात्र, नाथपंथीय समाजाचे प्रमुख गुरु गोरक्षनाथ महाराज असल्याने,
या महामंडळाला “गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ” हे नाव द्यावे,
अशी मागणी शासन निर्णय क्रमांक महाम/२०२४/८०. प्रक्र/ महामंडळे मध्ये शुद्धिपत्रक काढून करण्यात आली आहे.
नाथपंथीय समाजाच्या वतीने निवेदन सादर
नाथपंथीय समाजाच्या या मागणीसाठी युवा नाथ संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल इंगळे, तसेच
डॉ. संगीता सुरंसे, सुबोध वंजारे, पत्रकार दिलीप तिहीले, स्वप्निल पाठक, नागेश जाधव, गजानन वाडेकर,
गणेश चिलवंत, हर्षवर्धन पारस्कर, दिवाकर गौरकर, अभिषेक पाठक,
अंजली कासार यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदन दिले.
शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
नाथपंथीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उभारलेल्या या महामंडळाला त्यांच्या प्रमुख
गुरुंचे नाव मिळावे, यासाठी शासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा,
अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.