हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक
विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांचे नाव द्यावे,
अशी मागणी युवा नाथ संघटना महाराष्ट्र आणि नाथ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
नाथपंथीय समाजाच्या गुरु आणि आराध्य दैवत परमपूज्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे नाव या महामंडळाला देण्यात यावे,
अशी मागणी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी
महामंडळाच्या स्थापनेसाठी शासनाने “परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ”
हे नाव निश्चित केले आहे. मात्र, नाथपंथीय समाजाचे प्रमुख गुरु गोरक्षनाथ महाराज असल्याने,
या महामंडळाला “गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ” हे नाव द्यावे,
अशी मागणी शासन निर्णय क्रमांक महाम/२०२४/८०. प्रक्र/ महामंडळे मध्ये शुद्धिपत्रक काढून करण्यात आली आहे.
नाथपंथीय समाजाच्या वतीने निवेदन सादर
नाथपंथीय समाजाच्या या मागणीसाठी युवा नाथ संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल इंगळे, तसेच
डॉ. संगीता सुरंसे, सुबोध वंजारे, पत्रकार दिलीप तिहीले, स्वप्निल पाठक, नागेश जाधव, गजानन वाडेकर,
गणेश चिलवंत, हर्षवर्धन पारस्कर, दिवाकर गौरकर, अभिषेक पाठक,
अंजली कासार यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदन दिले.
शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
नाथपंथीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उभारलेल्या या महामंडळाला त्यांच्या प्रमुख
गुरुंचे नाव मिळावे, यासाठी शासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा,
अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.