IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे.
ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्म
सिटीच्या संयुक्त एमडी म्हणून काम केले आहे. त्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस विभागात सहायक सचिव होत्या
Related News
संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५ —
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय...
Continue reading
पुणे | १७ एप्रिल २०२५ –
स्वारगेट बस स्थानकावर फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार
प्रकरणाचा समरी अहवाल आता समोर आला असून, त्यातून आरोपी दत्ता गाडे
याच्या विकृत...
Continue reading
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
IAS Aanchal Goyal Inspiring Story: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2014 बॅचच्या IAS अधिकारी आंचल गोयल
यांना मुंबई शहराचे जिल्हाधिकारी केले आहे. मागील महिन्यात मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिकामे होते.
त्यांच्या जागी आता आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंचल गोयल यांनी यापूर्वी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
आगामी मुंबई मनपाच्या निवडणुका पाहता ही जबाबदारी खूप महत्वाची आहे. 2014 बॅचच्या IAS अधिकारी आंचल गोयल यांची बदली
रद्द करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये जनतेने जनआंदोलन केले होते. तेव्हापासून त्या चर्चेत आहेत.
नागपूर मनपात त्यांनी केलेल्या कामांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली आहे.
जनतेच्या आंदोलनामुळे राज्यभर चर्चा
ऑगस्ट 2021 मध्ये परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्यानंतर आयएएस अधिकारी आंचल
गोयल यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
त्यावेळी दीपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती केली होती.
गोयल परभणीत रुजू होण्यासाठी 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या.
परंतु त्यांना मुंबईत परत बोलवण्यात आले. यामुळे त्या पदभार न स्वीकारता परतल्या होत्या.
परभणीकरांनी या निर्णयाविरूद्ध आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय चर्चेत आला.
अखेर तत्कालीन सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल राहणार असल्याचे स्पष्ट केले,
त्यानंतर परभणीकरांचे आंदोलन थांबले होते.आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे.
ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्म सिटीच्या संयुक्त एमडी म्हणून काम केले आहे.
त्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस विभागात सहायक सचिव होत्या.
2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या आंचल गोयल यांचे शिक्षण चंडीगडमध्ये झाले. त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स) केले.