आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याबाबत उदासीनता; नागरिकांना नाहक त्रास

विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्‌तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. ➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही. ➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 📢 ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. 🔊 सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन ➡️ "आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही." 👥 नागरिकांचे म्हणणे गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार) ➡️ "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही. महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे." ➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या

पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला

जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Related News

💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष

गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्‌तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे.

➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही.
➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला,

तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

 सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन

“आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.

त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही.”

 नागरिकांचे म्हणणे

गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार)

“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही.

महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.”

➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related News