बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
अशातच आमिर खानने नुकतीच धनंजय यांची भेट घेतली.
Related News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनिव्हामधील ७८व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीला नवी दिल्लीहून व्हर्च्युअली संबोधित केल्यानंतर,
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदानॉम गेब्रेयेसस ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकतेच एका अल्पवयीन मुलाला भारताविरुद्ध जासूसी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी
असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीनंतर प...
Continue reading
पुणे – राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर
आल्यानंतर आता संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप...
Continue reading
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असे...
Continue reading
अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात...
Continue reading
अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाच...
Continue reading
बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं.
त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली.
आता अभिनेता आमिर खानने सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळतंय.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता.
या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात आमिर हा धनंजय आणि विराज देशमुख यांच्याशी चर्चा करताना दिसून येत आहे.
यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात
आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा
निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या
कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर
शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातत संतापाची लाट उसळली.
या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला. हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत.
या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं.
पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रातदेखील याचा उल्लेख आहे. “6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी
मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग इथले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती.
तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.
त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली”, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.