चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाने कहर केला असून, सध्या पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दरवर्षी १ मेपासून करण्यात येणाऱ्या वेळेच्या बदलाची अंमलबजावणी यंदा आठवडाभर आधीच करण्यात आली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्यात वाघ व अन्य वन्यजीव नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात.
त्यामुळे व्याघ्र दर्शनाची संधी वाढते. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक त्रस्त होत असल्याने प्रशासनाने
दुपारच्या सत्रातील सफारीची वेळ २.३० ते ६.३० ऐवजी आता ३.०० ते ७.०० अशी निश्चित केली आहे.
सफारी बुकिंग रद्द, पर्यटकांचा कल थंड हवामानाकडे
गेल्या आठवड्यापासून चंद्रपुरात तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान आहे.
या तीव्र उष्णतेमुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यातील अनेक सफारी बुकिंग्स रद्द करण्यात आली आहेत.
पूर्वी उन्हाळ्यातील शाळांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी दिसायची, मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे पर्यटक थंड हवामानाच्या ठिकाणी जाणं पसंत करत आहेत.
प्रशासनाकडून आरोग्यविषयक सूचना
पर्यटकांनी सफारीसाठी निघण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्यावी, भरपूर पाणी प्यावं, टोपी, सनग्लासेस आणि हलके,
उन्हापासून संरक्षण करणारे कपडे वापरावेत, असे आरोग्यविषयक सल्ले प्रशासनाने दिले आहेत.
स्थानिक मार्गदर्शकांचा निर्णयाला पाठिंबा
ताडोबामधील स्थानिक मार्गदर्शक, वाहनचालक व पर्यटन व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
“उन्हाळ्यात पर्यटन वाढतं, पण यंदाची गरमी खूपच लवकर जाणवतेय.
वेळ पुढे ढकलल्यामुळे पर्यटकांना थोडा दिलासा मिळेल,” असं एका मार्गदर्शकाने सांगितलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-santapachi-lat/