गडचिरोली — गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीच्या विस्ताराला पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असून,
यासाठी ९०० हेक्टर जंगलातील १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयामुळे ३० ते ४० गावांतील
सुमारे ५० हजार नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता असून टायगर कॉरिडोर धोक्यात येणार आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या उत्खनन क्षमतेला १० दशलक्ष टनांवरून २६ दशलक्ष
टनांपर्यंत वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ‘अयस्क-वॉशिंग प्लांटसाठी’ ९०० हेक्टर
जंगलात झाडांची तोड मान्य करण्यात आली आहे.
पर्यावरण तज्ञ आणि आदिवासी समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरु आहे.
दरम्यान, नक्षलवादग्रस्त या भागात खाण उत्खननाच्या विस्तारामुळे जंगलाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/vatporeima-akshay-tree-pranvayu-danara-wad/