दिल्ली –
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून,
या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी
Related News
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
Continue reading
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
Continue reading
अकोला :
अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
Continue reading
अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस...
Continue reading
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
Continue reading
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
Continue reading
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
Continue reading
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
Continue reading
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
Continue reading
अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
Continue reading
हल्ला मानला जात असून, या हल्ल्यामागे असलेला मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद उर्फ
सैफुल्लाह कसुरी हा TRF (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.
हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि लष्करचा उपप्रमुख
सैफुल्लाह खालिदचा संबंध थेट लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असून,
तो हाफिज सईदचा निकटवर्तीय समजला जातो. तो TRF आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) या
संघटनांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे उघड झाले आहे.
त्याने 2000 च्या दशकात पाकिस्तानातील मुरीदके येथील लष्कर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार
सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्ला आणि नौमान या नावांनीही ओळखला जातो.
तो गेल्या 20 वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रिय असून, पूंछ-राजौरी भागामध्ये लष्करच्या कारवायांचे तो प्रमुख सूत्रधार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील खुईरट्टा दातेस भागातून तो भारतात दहशतवाद्यांना पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
TRFच्या स्थापनेमागे खालिद
TRF आणि PAFF या संघटनांची स्थापना सैफुल्लाह खालिदनेच केली.
हल्ल्यांची थेट जबाबदारी टाळण्यासाठी, या संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या अन्य गटांच्या नावाखाली काम करतात.
TRF ही लष्कर-ए-तैयबाच्या छुप्या कारवायांची ‘फ्रंट ऑर्गनायझेशन’ मानली जाते.
पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग
गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, सैफुल्लाह खालिदने पहलगाम हल्ल्याच्या
पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते.
काही दिवसांपूर्वीच तो भारतात घुसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, खालिद सध्या NIA व इतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.
काश्मीर ताब्यात घेण्याची वल्गना
फेब्रुवारी 2025 मध्ये खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत सैफुल्लाह खालिदने भारताविरुद्ध भडकावू भाषण दिले होते.
“आज 2 फेब्रुवारी 2025 आहे. आम्ही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेऊ,” अशी वल्गना त्याने केली होती.
त्याच्या या वक्तव्यांमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhargad-these-veteran-mahilas-fatal-mahaan/