पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?

दिल्ली

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून,

या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी

Related News

हल्ला मानला जात असून, या हल्ल्यामागे असलेला मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद उर्फ

सैफुल्लाह कसुरी हा TRF (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.

हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि लष्करचा उपप्रमुख

सैफुल्लाह खालिदचा संबंध थेट लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असून,

तो हाफिज सईदचा निकटवर्तीय समजला जातो. तो TRF आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) या

संघटनांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे उघड झाले आहे.

त्याने 2000 च्या दशकात पाकिस्तानातील मुरीदके येथील लष्कर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार

सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्ला आणि नौमान या नावांनीही ओळखला जातो.

तो गेल्या 20 वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रिय असून, पूंछ-राजौरी भागामध्ये लष्करच्या कारवायांचे तो प्रमुख सूत्रधार आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील खुईरट्टा दातेस भागातून तो भारतात दहशतवाद्यांना पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

TRFच्या स्थापनेमागे खालिद

TRF आणि PAFF या संघटनांची स्थापना सैफुल्लाह खालिदनेच केली.

हल्ल्यांची थेट जबाबदारी टाळण्यासाठी, या संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या अन्य गटांच्या नावाखाली काम करतात.

TRF ही लष्कर-ए-तैयबाच्या छुप्या कारवायांची ‘फ्रंट ऑर्गनायझेशन’ मानली जाते.

पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग

गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, सैफुल्लाह खालिदने पहलगाम हल्ल्याच्या

पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते.

काही दिवसांपूर्वीच तो भारतात घुसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, खालिद सध्या NIA व इतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

काश्मीर ताब्यात घेण्याची वल्गना

फेब्रुवारी 2025 मध्ये खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत सैफुल्लाह खालिदने भारताविरुद्ध भडकावू भाषण दिले होते.

“आज 2 फेब्रुवारी 2025 आहे. आम्ही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेऊ,” अशी वल्गना त्याने केली होती.

त्याच्या या वक्तव्यांमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/dhargad-these-veteran-mahilas-fatal-mahaan/

Related News