माय ममता झाली काळी!

माय ममता झाली काळी! तेलंगणामधील आईने तीन चिमुरड्यांना विष देऊन संपवले; अनैतिक संबंधासाठी घेतला थरारक निर्णय

संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय महिलेला आपल्या अनैतिक

Related News

संबंधांमुळे तीन चिमुकल्यांचे बळी द्यावेसे वाटले.

पोलिस तपासात उघड झालेल्या या धक्कादायक माहितीने परिसरात खळबळ उडाली आहे.

२७ मार्च रोजी, रात्रीच्या जेवणात रजिताने दह्यामध्ये विष मिसळले होते.

तिचा नवरा चेन्नय्या कामावर गेल्यामुळे तो वाचला, पण तीनही मुलांनी ती दही खाल्ली आणि काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.

दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतलेल्या चेन्नय्याला मुले बेशुद्धावस्थेत आढळली,

तर रजिता देखील पोटदुखीची तक्रार करत होती. त्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

सुरुवातीला पोलिसांनी संशयाच्या धर्तीवर चेन्नय्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते,

मात्र पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

एका गेट-टुगेदर कार्यक्रमात रजिताची एका जुन्या मित्राशी पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात

अनैतिक संबंध सुरु झाले. नंतर या संबंधांना पुढे नेत नवीन आयुष्य जगण्यासाठी रजिताने

स्वतःच्या मुलांचा जीव घेण्याचा अमानुष निर्णय घेतल्याची कबुली तिने दिली.

पोलिसांकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील संपूर्ण माहिती अधिकृतपणे दिली जाणार आहे.

या घटनेने स्थानिकांसह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-samari-ahwal-ughad/

Related News