शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले.
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी नुकताच अत्यंत खळबळजनक खुसाला केला.
गोरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, पद मिळते.
ज्यानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
हेच नाही तर त्यांनी थेट नीलम गोरे या बाई आहेत का?. त्या बाई माणूस असल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले.
त्यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली.
सुषमा अंधारे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
नीलम गोरे यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचे म्हणतानाही संजय राऊत दिसले.
आता नुकताच
यांच्या विधानाचा समाचार घेताना घेत
शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केलीये.
त्यांनी एकप्रकारे मोठा इशाराच उबाठा गटाला दिलाय. संजय शिरसाट यांनी म्हटले की,
मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकिट दिले, त्यांना जाऊन विचारा.
माझ्या जिल्हापुरतेच सांगतो, माझ्याविरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता…
किती दिवसांचा आठ दिवसांचा. पक्षात येऊन आठ दिवस झालेल्या माणसाला तुम्ही तिकिट देता?
मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते?
जे गेले 20 ते 30 वर्ष तुमच्यासोबत काम करतात. त्यांना तिकिट का नाकारलं?
आज तो माणूस कुठे आहे विचारा त्यांना.
पुढे गंभीर आरोप करताना शिरसाट म्हणाले की,
मराठवाड्यात यांनी अनेक ठिकाणी पैसे घेतले आणि तिकिटे वाटली
आणि त्याची परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात,
ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ला ते शिवसैनिक बाजूला पडले.
आता जे दलाल आहेत जे बोलतायत त्या दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.
म्हणून कोणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता याचे एकदा स्पष्टीकरण द्या.
More update here
https://ajinkyabharat.com/gaja-maneneche-day/