महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत
राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार
आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा
निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा
निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून
मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे
महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात
झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा
निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून
जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार
असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत
एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल
हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर
शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महाविकासआघाडीतील
जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि
शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २
आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे.
महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे.
त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १
समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर
मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात
संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता
आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर
तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस
आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/